तिच व्याधी,तेच दुःख रोज मी स्मरु किती?
या अनोळखी जगात आपलेपणा शोधु किती?
नेहमीच दिसती ह्या डोळ्यांना इवलेसे धुके
पणं पिसाट वादळांना आज आवरु किती?
राहिला तुझा न भास,राहिला न श्वास
जे दिलेस होते रंग,त्या रांगोळीत भरु किती?
संपले न गीत हे अजुन आयुष्यातले
सुख-दुःख,आनंद-राग,सांग दाखऊ किती?
मिच यायचे दुरुन,जवळ तु नसायचे
एक एक मिनिट माझेच मी मोजु किती?
(कल्पेश फोंडेकर)
No comments:
Post a Comment